Posts

श्री हिरोजी इंदुलकर

Image
#सेवेचे_ठायी_तत्पर - #हिरोजी_इंदुलकर #श्री_हिरोजी_इंदुलकर" ( #रायगड_निर्माता ) स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा (अभियंता) Engineer जगात होणे नाही. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते, की जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो. आताही तो रायगड पाहायला भेटतो. असे फक्त शिवकाळात होऊ शकते, आणि त्या शिलालेख प्रमाणे आज ही रायगड पाहायला भेटतो. ◆जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख : ।। श्री गणपतयेनमः ।। ।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।। ।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।। ।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।। ।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। ।। वापीकूपतडागराजिरू ।। ।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।। ।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।। ।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।। अर्थ :- सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे...

बहिर्जी नाईक महाराजांचा तिसरा डोळा🚩🚩

Image
*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण* १०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..! तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…! शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…! माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..! मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…! खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…! गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…! पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते ...

श्री शिवराज्याभिषेक सोहळा🚩🚩

Image
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक: छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म...

🚩🚩शिवविचार🚩🚩

Image
प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थीत शिकत असताना पहिल्यांदाच इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांशी गाठ पडली. पहिल्याच पानावर शिवराय घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं.  शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा व्हायच होतं ते चित्र आठवते का ? अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या.  आगऱ्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं. गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना नरवीर तानाजी मालुसरेंसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या.  त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्य...

मराठा साम्राज्याच्या महाराणी

Image
मराठा साम्राज्याच्या महाराणी "सईबाई भोसले"🚩 🚩💥💥 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या सईबाई फारसे लिखाण कुठे आढळत नाही. खरे तर जिजाऊ साहेबांनंतर महाराजांच्या जीवनात यांचे खूप जास्त महत्व होते पण केवळ २६ वर्ष आयुष्य लाभलेली ही महाराणी इतक्या कमी आयुष्यात सुध्दा खुप मोठे काम करून गेली. फलटणचे राजे श्री. मुधोजीराव निंबाळकर आणि रेऊबाई निंबाळकर यांच्या पोटी सईबाई यांचा जन्म इ. स. १६३३ साली फलटण येथे झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्या काळातील पध्हतीप्रमाणे त्यांचे शिवाजी राजांबरोबर लग्न झाले आणि सईबाई पुण्याला जिजाऊंच्या छत्रछायेखाली आल्या. गौर वर्ण चुणचुणीत आणि मुळातच हुशार असणाऱ्या सईबाईंच्या हुशारीला जिजाऊच्या छायेत अजूनच धार चढलीहा काळ तसा खुप धामधुमीचा होता. शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग जोरात चालू होता. त्यांचा पाय घरात ठरत नव्हता. सतत लढाई, घोडदौड, मोहिमा चालू होत्या. या काळात नवीनच आकाराला येत असणाऱ्या स्वराज्याचे फडावरील काम जिजाबाई पाहत होत्या आणि त्या हा सर्व पसारा यशवीपणे सांभाळत असताना त्यांच्या हाताखाली सईबाई तयार होत होत्य...

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

Image
                                  #शिवविचार 🚩🚩     छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण सर्व आज सर्रास छत्रपती शिवाजी महाराज की जय अस म्हणतो व कधी पासून म्हणायला सुरुवात झाली त्यामागेही एक अतिशय रोचक कथा आहे व . १ सप्टेंबर १९३९ मध्ये युरोपात दुसऱ्या महायुद्धाची औपचारिक सुरुवात झाली व नंतर त्याचे लोण जगभर पसरले. यावेळी इंग्लंड, अमेरिका, रशिया सारख्या देशांविरुद्ध जर्मनी, इटली, जपान, स्पेन वगैरे देश सक्रियपणे लढत होते. आज एक देश दुसऱ्यावर तर उद्या तिसरा दुसऱ्यावर अशी कुरघोडी सुरू होती. या सर्व घटना पाश्चात्य जगात घडताना भारत काय करत होता ? तर भारतीय लाखो सैनिक इंग्लंडच्या बाजूने युद्धात आफ्रिका, युरोप, पूर्वभागात प्राणपणाने लढत भारताची मर्दुमकी सिद्ध करत होते. आज पूर्व आफ्रिकेत ऍरिट्रीया (Eritea) नामक देश आहे ज्यावर त्याकाळी इटलीची अधिसत्ता होती. या इटलीशासित ऍरिट्रीयावर १९४१ मध्ये इंग्लडने आक्रमण केले आणि याभागात युद्धास तोंड फुटले. या सैन्यात भारतीय, सुदानी सैनिकांचा भरणा चांगल्या मोठ्या प्र...

असे होते छत्रपती शिवराय🚩🚩🦁🦁

Image
#श्री छत्रपती शिवाजी महाराज🦁🦁🚩🚩🙏🙏   असे होते छत्रपती शिवराय...! विश्‍ववंदणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आजवर जगभरातील इतिहास अभ्यासकांनी विविधांगी भरपूर लेखन केलेले आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणांवर, त्यांच्या मोहिमांवर व त्यांच्या प्रशासन, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण यासह त्यांच्या गड-किल्ल्यांबाबत व त्या गड-किल्ल्यांच्या बांधकाम तंत्राबाबत हि बरेच लिहीले गेलेले आहे. मुळामध्ये छत्रपती शिवराय म्हणजे अखंडपणे प्रवाहित असणारा प्रेरणादायी झरा आहेत. कित्येकांच्या जगण्याची छत्रपती शिवराय हि जणू जीवनप्रणालीच आहेत. असे अनेकांची जीवनप्रणाली असणारे छत्रपती शिवराय नमेके कसे होते ? हे आपण या लिखानाच्या माध्यमांतून मांडण्याचा-पहाण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणे हाच मर्यादित हेतू सदर लिखानाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच साधेपणाचा होता. * छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्...